By  
on  

नंदिता वहिनीच्या तिरस्काराची आग यावेळी खरंच घेणार का राणादाचा बळी?

'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. कथानकामधले ट्विस्ट अँड टर्न्स आणि राणादाचं कमबॅक या गोष्टींमुळे ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहे. आता या मालिकेत प्रेक्षकांना धक्का देणारा एक नवा ट्विस्ट येणार आहे. 

'तुझ्यात जीव रंगला' मधील वहिनी राणादाचं नेहमीच वाईट व्हावं यासाठी प्रयत्नशील असते. त्यामुळे आता नंदीता वहिनीने एक वेगळाच डाव साधला आहे. राणाला एका गोडाऊनमध्ये बंद करून नंदिता तिच्या गड्यांना गोडाऊनमध्ये आग लावण्याचं फर्मान सोडते. 

 

 

गाडी आग लावून निघून जातात. हे सर्व राणाचा लहान भाऊ सुरज पाहतो. पण तो राणाला वाचवू शकत नाही. हा सर्व धक्कादायक प्रसंग तो घरी येऊन सर्वांना सांगून राणादा सोडून गेल्याची दुःखद बातमी सर्वांना सांगतो. त्यानंतर अंजली आक्रोश करते. आता राणादाची मालिकेतून खरंच एक्झिट झाली आहे का? की या खडतर प्रसंगातून राणादा सहीसलामत बाहेर येऊन नंदिता वहिनीचा बदला घेणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.  

Recommended

PeepingMoon Exclusive