राणादा आणि अंजलीची तुझ्यात जीव रंगला ही मालिका रसिकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेने आता एक हजार भागांचा टप्पा पुर्ण केला आहे. यावेळी सेटवर जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी मालिकेची सगळी टीम उपस्थित होती. 3 ऑक्टोबर 2016मध्ये या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता.
आजपर्यंत ही मालिका रसिकांचं अव्याहत मनोरंजन करताना दिसत आहे. गावातल्या शाळेत शिकवणा-या पाठकबाई आणि लाजरा बुजरा पैलवान राणा यांची केमिस्ट्री सगळ्यांना आवडली. लाडूच्या येण्याने या मालिकेत आणखी रंजकता आली. ‘नाबाद १००० तुम्हा रसिकांचे प्रेम असेच सदैव राहू द्या.’ या कॅप्शनखाली मालिकेच्या टीमचा फोटो शेअर करण्यात आला आहे.