'अग्गंबाई सासूबाई' ही मालिका अल्पावधितच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. एका वेगळ्या आणि हटके वळणावरची प्रेमकहाणी प्रेक्षकांनीसुध्दा आपलीशी केली. आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी झटणा-या सासुबाईंना त्यांच्या उतारवयात हक्काचा सोबती मिळवून देण्याच घाट सूनबाई शुभ्राने घातला आहे पण त्यात अनेक विघ्न आता समोर येऊ लागली आहेत. अभिजीत राजेंनी आपलं प्रेम आसावरीपुढे व्यक्त केल्यानंतर आता आसावरी कोणता निर्णय घेते याची सर्वांना उत्सुकता लागुन राहिली आहे.
आईच्या आणि अभिजीत राजेंच्या प्रेमाबद्दल सोहमला सर्व समजतं. आई यात गुंतू नये म्हणून सोहम एक कठोर निर्णय घेतो. कथानकाप्रमाणे सोहम हा आईला त्यांच्या गावी आकेरीला म्हणजे कोकणात पाठवण्याचं ठरवतो. हा विशेष भाग चित्रित करण्यासाठी मालिकेच्या सर्व चमूने गेली काही दिवस सावंतवाडीतील आकेरी गावात तळ ठोकला. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेमुळे कोकणातील आकेरी गावाला सध्या प्रसिध्दी वलय प्राप्त झालं आहे. त्यात आता 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेचे काही भाग तिथे चित्रित होतील. त्यामुळे कोकणताील निसर्गसौंदर्यासह या मालिकेचे पुढील उत्कंठावर्धक भाग पाहणं म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.
चुकामुक...? #AggabaiSasubai #ZeeMarathi @tejupradhan0206 pic.twitter.com/U5TNLUotAO
— Zee Marathi (@zeemarathi) December 7, 2019