By  
on  

अभिजीत राजेचं तंबू आंदोलन, दत्ताजी उचलणार कोणतं पाऊल?

अग्गबाई सासूबाई ही मालिका आता एका वेगळ्याच वळणावर आली आहे. अभिजीत राजेंनी आसावरीसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. कोकणात गेल्यावर आसावरीनेही त्यांच्या प्रेमाचा स्विकार केला आहे. पण दत्ताजींना मात्र अभिजीत आणि आसावरीचं हे नातं मान्य नसतं. त्यांनी आसावरीला घर किंवा अभिजीत यापैकी एक निवडण्याची संधी दिली. त्यामुळे आसावरीने घरातच राहायचा निर्णय घेतला. 

 

 

पण काहीही करून आपल्या नात्याला दत्ताजींची संमती मिळवण्याचं अभिजीत राजे ठरवतात. त्यासाठी ते आसावरीच्या घराबाहेर तंबू बांधून राहू लागतात. हे दत्ताजी पाहतात. त्यामुळे आता ते यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Recommended

PeepingMoon Exclusive