ऐतिहासिक सिनेमा ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं काही दिवसांपुर्वीसमोर आलं होतं. या मालिकेचा पहिला एपिसोड 2018मध्ये प्रसारित झाला होता. त्यानंतर गेली जवळपास दोन वर्षं या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे. या मालिकेच्या शेवटचा एपिसोड फेब्रुवारीमध्ये प्रसारित केला जाणार आहे.
एक प्रवास कधीच न विसरता येणारा...... pic.twitter.com/jrjgtZ9rVS
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 2, 2020
यावेळी छत्रपती संभाजी महाराज साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करून भावना व्यक्त केल्या आहेत. ‘सुरु झालेला प्रत्येक प्रवास कधी ना कधी संपतोच अशी सुरवात करत अमोल यांनी या मालिकेची आठवण न विसरता येण्यासारख्या असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेले संभाजी महाराज, शंतनू मोघे यांनी साकारलेले शिवाजी महाराज, येसूबाई साकारत असलेल्या नम्रता गायकवाड यांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे.