‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत सध्या भावनिक वळण आलं आहे. औरंगजेबाने फितुरांच्या मदतीने शंभुराजांना कैदेत टाकलं आहे. येसुबाईंचं दु:ख हे ऐकून अनावर झालं आहे. याचवेळी त्यांना दिसतात त्या प्रेमळ पण खंबीर जिजाऊ. ‘जिजाऊ येसुबाईंची समजुत घालताना दिसतात. त्या म्हणतात, ‘प्रसंग मोठा कठीण आहे. तुम्ही खंबीर राहणं गरजेचं आहे. यावेळी महाराष्ट्राची जगदंबा म्हणून तुम्हाला वावरावं लागेल.’
आपल्यावर आलेल्या कठीण प्रसंगापेक्षा स्वराज्याला प्रथम प्राधान्य देणाऱ्या महाराणी येसूबाई . #ZeeMarathi #SwarajyarakshakSambhaji @amitbehl1 @kolhe_amol pic.twitter.com/aY9elM4M07
— Zee Marathi (@zeemarathi) February 22, 2020
यावेळी येसुबाई राजाराम महाराजांना म्हणतात, ‘स्वराज्य सांभाळायला हवं. आता तुम्ही नवे छत्रपती आहात.’ संभाजी महाराजांच्या कैदेच्या एपिसोडनंतर फॅन्सही भावनिक झालेले दिसत आहेत. अनेकांनी या मालिकेतील पुढचे भाग पाहणं भावनिकदृष्ट्या कठीण असल्याच्या कमेंटही केल्या आहेत.