अनेक अडचणी, गैरसमज वाद-विवादानंतर शिवा आणि सिद्धी यांच्यात पहिल्यांदा मैत्री आणि त्यानंतर प्रेम झालं. आता हे मैत्री आणि प्रेमाचं नातं आता लग्नबंधनात बांधलं गेलं आहे. आत्याबाईंचा द्वेष बाजुला ठेवून शिवा-सिद्धी कायमसाठी एकमेकांचे झाले आहेत. मालिकेमध्ये दोघांच्या संमतीने, आनंदात आणि मोठ्या जल्लोषात हा विवाहसोहळा साजरा झाला.
यावेळी मुलीकडून म्हणजे सिध्दीकडून होत्या काकी, सोनी आणि शिवाकडून असणार होते जलवा, पिंट्या-बबल्या. मधुचंद्राच्या रात्री शिवाने सिद्धीसाठी खास सरप्राईज अरेंज केलं आहे. नदीकिनारी शिवाने सिद्धीसाठी खास टेंट लावला आहे. त्याला डेकोरेशनही केली आहे. हे पाहून सिद्धीनेही शिवावरील आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.