स्टार प्रवाहवर लवकरच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. निर्माता दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजन्सने या मालिकेचीं निर्मिती केली आहे. अभिनेत्री वर्षा उसगावकर या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
काहीशी हटके अशी वर्षां यांची भूमिका आहे. ‘नंदिनी यशवंत शिर्के पाटील’ ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. काहीशी घरंदाज वळणाची ही भूमिका आहे. परदेशातून आलेला मुलगा जयदीप याच्यासाठी उत्तम पत्नी आणण्याची मनीषा नंदिनी शिर्के बाळगून आहेत. आता त्यांची इच्छा पुर्ण होते का ते लवकरच समजेल.
गिरीजा प्रभू या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. साधी भोळी गौरी आणि तिच्या आयुष्यात आलेलं महत्त्वाचं वळण या मालिकेत दिसणार आहे. यासोबतच जयदीपच्या भूमिकेत मल्हार जाधव दिसणार आहे. त्याशिवाय माधवी निमकरही या मालिकेत दिसणार आहे.