स्त्री शिक्षणाचा पाया रोवत प्रगतीचं नवं दार उघडणा-या शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई. जोतीरावांचं शिक्षण, त्यांनी समाजात बदल घडवून आणण्यासाठी केलेली धडपड, त्यांना मिळालेली सावित्रीमाईंची साथ यातून इतिहास घडला. पण यासाठी सावित्रीबाईंना चालावी लागणारी वाट मात्र काट्याकुट्यांची होती.
स्त्रियांना कोणतेही स्वातंत्र्य नसलेल्या काळात सावित्रीबाई स्वतः शिकल्या व पहिल्या स्त्री-शिक्षिका झाल्या. पण त्यांना त्यासाठी अप्रिमित त्रास सहन करावा लागला. कुजकट टोमणे, शेणगोळे, चिखल प्रसंगी दगड याचा मारा सहन करत सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची वाट चालली. त्यांच्यावरी अत्याचाराविरुद्ध सावित्री माई आता कंबर कसून तयार झाला आहेत. त्रास देत असलेल्या व्यक्तीविरोधात त्यांनी महिषासुर मर्दिनीचा अवतार धारण केलेला ‘सावित्री जोती’ मालिकेच्या आगामी भागात दिसणार आहे.