By  
on  

पाहा व्हिडिओ: कोल्हापुरातील पुराचा फटका बसला 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील कलाकारांना

कोल्हापूर जिल्यात सध्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती ओढवली असून कोल्हापुरातील १५ हजार सामान्य नागरिकांना या पुराचा फटका बसला. याच पुराचा सामना 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील कलाकारांना करावा लागला. 

एका आघाडीच्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत या मालिकेतील राणा हे पात्र साकारणारा हार्दिक जोशी म्हणाला,''कोल्हापूरमधील वसगडे गावात या मालिकेचेशूटिंग सुरू आहे. मात्र  पावसामुळे गावात  ठिकठिकाणी पाणी साचलं आहे, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव मालिकेचे शूटिंग दोन दिवस बंद आहे. मंगळवार आणि बुधवार दोन दिवस मालिकेचं शूटिंग बंद ठेवण्यात आले आहे, परिस्थिती पाहूनच पुढील भागांचं शूटिंग सुरू करायचे की नाही याचा निर्णय घेण्यात येईल.''

 

तुंबलेल्या पाण्यातून वाट काढणाऱ्या मालिकेतील कलाकारांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. यावेळी साचलेल्या पाण्यामधून चालताना कलाकारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यावेळी अभिनेता हार्दिक जोशी तेथील नागरिकांना हात दाखवताना दिसत आहे. 

या व्हिडिओमध्ये हार्दिक जोशीसह अभिनेत्री अक्षय देवधर, अभिनेत्री  धनश्री काडगांवकर आणि सिनेमाचं इतर युनिट पाहायला मिळत आहे. एकूणच पाऊस थांबून मालिकेचं शूटिंग लवकरात लवकर सुरु व्हावं यासाठी कलाकार प्रयत्नशील आहेत. 

Recommended

PeepingMoon Exclusive