अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या चिमुरड्या 'सिंधू'चा आता विवाह होणार आहे. एकोणिसाव्या शतकातील ही मालिका असल्याने हा बालविवाह आहे. देवव्रतशी लग्न होत असल्याने सिंधूच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे. यानिमित्त 'फक्त मराठी'ची नवनिर्मिती असलेल्या 'सिंधू..एका सामान्य मुलीची असामान्य कथा' या मालिकेच्या सेटवर लगीनघाई आहे.
अष्टपुत्रे यांची कन्या असलेली सिंधू आता रानडे यांची सून होणार आहे. त्यानुसार मालिकेच्या ट्रॅकमध्ये आता देवव्रताची सोडमुंज, देव प्रतिष्ठा, हळदी असा सगळा लग्नी तामझाम बघायला मिळेल. अर्थातच त्याला एकोणिसाव्या शतकाचा बाज असेल. त्यासाठी खास प्रॉपर्टी, साड्या, दागिने अशी सगळी तयारी करण्यात आली आहे.
सिंधूच्या आयुष्याला मिळत आहे एक नवे वळण, सुरू होत आहे एक नवीन पर्व, एक नवा प्रवास..
निरागस सिंधूला तिच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या टप्प्यात आपली साथ हवी आहे...#FaktMarathiTv #Maharashtra #Marathi #Entertainment #Sindhu #SindhuCheLagna pic.twitter.com/sfAPqfIU9t— Fakt Marathi TV (@FaktMarathiTV) August 21, 2019
सिंधूच्या प्रमुख भूमिकेतील अदिती जलतारे आणि देवव्रत साकारत असलेला श्रीहरी अभ्यंकर हे दोन्ही बालकलाकार त्यांचे अभिनयकौशल्य दाखवत आहेत. एकूणच गौरी किरण, मेघा मटकर, प्रभाकर वर्तक, शाश्वती पिंपळीकर, पूजा मिठबावकर आणि संपूर्ण स्टारकास्ट प्रेक्षकपसंतीस उतरत आहे.
खरे तर कोवळ्या वयात विवाहबंधनात अडकत असल्याने सिंधू असो वा देवव्रत दोघांनाही नेमके लग्न म्हणजे काय याची विशेष कल्पना नाही. मात्र आता यापुढे धाकटी आई भामिनीच्या जाचातून सिंधूची सुटका होईल अशी सगळ्यांना आशा आहे. आता यापुढे सिंधूच्या आयुष्यात नेमके काय काय घडेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना ही मालिका पाहावी लागेल.