शेवंताचा अण्णा नाईक आणि गावातल्या सा-या कटू आठवणी पुसून टाकण्याच्या व मुंबईला जाऊन नवं आयुष्य सुरु करण्याचा डाव फसला. पण हार न मानता शेवंताने गावात शिलाई मशीन आणून नव्या आयुष्याला सुरुवात करण्याचं ठरवलं. पण तिच्या मागचं शुक्लकाष्ट काही संपेना. तिने पुन्हा सावरण्याचा प्रयत्न करुनही नाईकांमुळे तिचं आयुष्य उध्दवस्त झालं आहे. त्यामुळे तिने नाईकांच्या वाड्यासमोर तळ ठोकला आहे.
शेवंता तावातावाने 'मेले तरी इथून उठणार नाही, नाईकांना आता सोडणार नाही' असं म्हणत नाईकांच्या वाड्यासमोर बसली आहे.