ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण ही मालिका रसिक प्रेक्षकांची आवडती आहे. पदेशातून मुंबईमध्ये आलेला नचिकेत आणि मुंबईतल्या एका मध्यमवर्गीय घरामध्ये वाढलेली संस्कारी सई यांची साधी सरळ प्रेमकथा ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेतून रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. सध्या ह्या मालिकेत नवनवे ट्विस्ट रसिकांना पाहायला मिळतायत.
आप्पा सई आणि नचिकेतला वेगळं करण्यासाठी हरत-हेचे प्रयत्न करतायत. नचिकेत काही कामानिमित्त पुण्यात गेला आहे. तेथून तो सईला फोन करतोय. परंतु नचिकेतलाच सईशी बोलायची इच्छा नाही असा गैरसमज आप्पा मुद्दाम निर्माण करतायत. त्यामुळे सई मात्र नचिकेत असा का वागतोय, या विचारात धाय मोकलून रडतेय.
आता सई-नचिकेतमधला हा दुरावा कसा संपणार, तिला कोण मदत करणार की आप्पा आणखी कोणती नवी खेळी करणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.