मराठीतील बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकर ओळखली जाते. मराठी सिनेसृष्टीच नाही तर बॉलिवूडमध्येसुध्दा अमृताने आपल्या अभिनयाची छाप पाडलीय. नटरंग, कट्यार काळजात घुसली, चोरीचा मामला, फुंक, वेलकम जिंदगी, राजी सत्यमेव जयते, मलंग अशा अनेक मराठी व हिंदी सिनेमांमधून अमृताने दमदार अभिनय साकारला.
अमृता खानविलकर हिने हिंदी मालिका तसेच टीव्ही अभिनेता हिमांशू मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली. या जोडीने प्रसिध्द डान्स रिएलिटी शो नच बलियेमध्ये आपल्या डान्सच्या केमिस्ट्रीने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. तेव्हापासून ह्या जोडीला मोठी प्रसिध्दी मिळाली.
गेल्या कित्येक दिवसांपासून अमृता मुंबईत तर हिमांशू दिल्लीत राहत आहेत. नुकत्याच झालेल्या करवा चौथचे औचित्य साधून अमृता आणि हिमांशू आपल्या इंस्टाग्रामवरून लाईव्ह आले होते. यावेळी दोघांनीही आपल्या नात्यातील अनेक गोष्टींचा चाहत्यांसोबत खुलासा केला.
“तुम्ही एकत्र का राहत नाही?” या एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर अमृता आणि हिमांशूने उत्तर दिलेले पाहायला मिळाले. ‘मी कामानिमित्त मुंबईत आहे अगदी दिवळीतही मी पूर्णपणे बिझी असून केवळ एकच दिवस मी सुट्टी घेतली आहे. तर हिमांशू त्याच्या आईला भेटायला दिल्लीला गेला आहे.’
चाहत्याला दिलेल्या या उत्तरासोबतच हिमांशूने २००४ साली पहिल्यांदा अमृताची भेट कशी झाली याचीही आठवण शेअर केली. आम्ही दोघे एकमेकांना गेल्या १६ वर्षांपासून ओळखत आहोत. डबु रत्नानी यांच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा आम्ही दोघे भेटलो होतो तिथेच सिध्दार्थने आमची ओळख करून दिली. आमच्या दोघांमध्ये आजही भांडणं होतात असे म्हणत अमृताने सांगितले की हिमांशू खूप शांत तर मी खूपच मस्तीखोर आहे. आमच्या नात्यात आंबट-गोड चविचं मिश्रण आहे.
दरम्यान, यंदा हिमांशूने लग्न झाल्यापासून दुस-यांदा अमृतासाठी करवा चौथचं व्रत ठेवलं होतं. तर अमृतानेही दरवर्षीप्रमाणे हे व्रत पतीसाठी केलंच.