By  
on  

रितेश आणि जेनेलिया देशमुखने मानले महाराष्ट्र सरकारचे आभार, कारण जाणून घ्या

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे मनोरंजनविश्वातलं  सर्वात लाडकं क्युट कपल. ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसोबतच ख-या आयुष्यातसुध्दा या जोडीची केमिस्ट्री लय भारी आहे. ही जोडी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. विविध व्हिडीओ आणि पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. परंतु नुकतंच त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत. हा व्हिडीओ दुसरा तिसरा कोणाचा नसून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आहे. 

रितेश देशमुख यांनी हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. मुंबईच्या वाहतूक कोंडीवर एक युक्ती म्हणून महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना जोडणा-या पूर्वमुक्त स्तेमार्गाची संकल्पना मांडली होती. त्यांच्यामुळेच हा मार्ग तयार होऊ शकला. त्यामुळे पूर्वमुक्त मार्गास माननीय विलासराव देशमुख यांचे नाव देण्याची मागणी शहराचे पालकमंत्री अस्लाम शेख .यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे गेल्यावर्षी केली होती. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive