By  
on  

‘चंद्र आहे साक्षीला’ मालिका घेणार आहे प्रेक्षकांचा निरोप सुबोध भावेने व्यक्त केल्या या भावना

सुरुवातील काहीशी गुढ वाटणारी रंजक मालिका म्हणजे ‘चंद्र आहे साक्षीला’. या मालिकेत आता एक हटके वळण आलं आहे. स्वाती, संग्राम आणि श्रीधर यांच्याभोवती फिरणा-या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. लग्नाच्या बेडीत अडकलेल्या स्वाती आणि संग्राम लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले गेले खरे. पण स्वातीच्या आयुष्यात पुन्हा एकदा श्रीधर नावाचं ग्रहण लागलं आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

 

पण या श्रीधरची कृष्णकृत्य संग्रामच्या समोर येतील की यातही स्वाती भरडली जाईल. हे मात्र पुढील भागात समजेलच. ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अभिनेता सुबोध भावेने खास पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत.

चंद्र आहे साक्षीला" एक अध्याय संपला. मनःपूर्वक धन्यवाद एक वेगळी भूमीका साकार करायला दिल्याबद्दल आणि माझ्या सर्व सह कलाकारांचे ही आभार आणि प्रेम आणि तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे आभार आणि प्रेम. भेटतो लवकरच एका नव्या रुपात.काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. प्रेक्षकही या मालिकेला मिस करतील यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive