नटरंग’, ‘बालगंधर्व’, ‘बालक-पालक’, ‘टाईमपास’, ‘टाईमपास-२’, ‘न्यूड’ अशा उत्तमोत्तम सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे दिग्दर्शक म्हणजे रवी जाधव. रवी सोशल मिडियावर अॅक्टीव्ह असतात. अनेकदा ते आठवणींना उजाळा देत असतात. आताही त्यांनी खास आठवण चाहत्यांशी शेअर केली आहे.
रवी यांनी जे. जे इन्स्टिट्युट ऑफ आर्ट्सला असतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये रवी म्हणतात, ‘काल कॉलेजचे ओळखपत्र एका जुन्या कपाटात सापडले… सोबत बऱ्याच आठवणी सापडल्या आणि त्यावेळी पाहिलेली काही स्वप्नेही… काही पूर्ण झाली काही बाकी आहेत कारण कॉलेज अजून संपलेले नाही.
शिक्षण अजून बाकी आहे. आता तर जिवनाचे खरे रंग उमगायला लागले आहेत. चित्र काढायचे अजून बाकी आहे.’ रवी आता आगामी ‘अनन्या’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हृता दुर्गुळे या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.