गेले जवळपास दिड वर्षं देशभरात करोना संकटाने थैमान घातलंय. अजूनही ते सुरुच आहे. दररोज करोना रुग्णांच्या संख्येत देशात व राज्यात लक्षणीय वाढ सुरुच आहे. सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत. यादरम्यान अनेकांची आर्थिक परिस्थिती जवळपास कोलमडून गेली.
अनेकांना नोकरी गमवावी लागली. अनेकांचे धंदे ठप्प झाले. लॉकडाऊनच्या याच परिस्थितीवर भाष्य करणारा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ‘पुनश्च हरिओम’ असं या नव्या सिनेमाचं नाव आहे. अभिनेत्री स्पृहा जोशी या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. लॉकडाऊनमध्ये ससेहोलपट होत असलेल्या सामान्य व्यक्तीची कथा आहे यात. स्पृहासोबत या सिनेमात विठ्ठल नागनाथ काळे हा अभिनेताही दिसतो आहे.