By  
on  

रवी जाधव यांनी शेअर केली कच्चा लिंबू सिनेमाची ही आठवण, केलं आगामी प्रोजेक्टचं सुतोवाच

‘कच्चा लिंबू’ सिनेमातून दिग्दर्शक रवी जाधव यांनी अभिनयात पदार्पण केलं. या सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारावरही मोहोर उमटवली. या सिनेमाने नुकतीच चार वर्षं पुर्ण केली आहेत. रवी यांनी जाधव या सिनेमाची आठवण शेअर केली आहेच. याशिवाय आपल्या आगामी प्रोजेक्टचं सुतोवाचही केलं आहे. 

 

 

रवी आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘कच्चालिंबूची ४ वर्षे ♥️ आज बघता बघता #कच्चालिंबू ला 4 वर्षं पूर्ण झाली... माझ्यासाठी हा चित्रपट एक अत्यंत आनंददायक अनूभव होता. अर्थात त्याचे श्रेय लेखक, दिग्दर्शक, निर्माते, माझे सहकलाकार आणि संपूर्ण टिमला जाते. आता ४ वर्षांनंतर लवकरच मी तूम्हाला एका हिंदी वेबसिरीजमध्ये अशाच एका आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा मला सांभाळून घेणाऱ्या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार...!!! रवी आता पुन्हा एकदा अभिनेत्याच्या रुपात पाहणं चाहत्यांना पर्वणी असेल यात शंका नाही. यासोबतच रवी ‘अनन्या’ या सिनेमाचं दिग्दर्शनही करत आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive