By  
on  

अभिनेते मिलिंद गवळी यांनी या ‘गोड’ मित्राबाबतच्या भावनेला करुन दिली वाट

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनिरुद्धच्या व्यक्तिरेखेत दिसणारे मिलिंद गवळी यांचं फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. मिलिंद यांची भूमिका ग्रे शेडची असली तरी व्यक्तिरेखेचं बेअरिंग सगळ्यांना आवडलं आहे. मिलिंद यांनी अलीकडेच सोशल मिडियावर खास मित्रासोबतची आठवण शेअर केली आहे. अभिनेता सुनील बर्वेंबाबतच्या भावनांना वाट करुन दिली आहे.

 

 

मिलिंद आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘आपण आपल्या कशा गोड मित्राला भेटतो तेव्हा 26 वर्षाचा आमच्या दोघांचा सिनेमा क्षेत्रातला प्रवास आठवतो. गेल्या सव्वीस वर्षात एकदाही परत एकत्र काम करायची आम्हाला संधी मिळाली नाही, खूप वर्षांपूर्वी गोविंद कुलकर्णी दिग्दर्शित "असंच पाहिजे नवंनवं" या चित्रपटांमध्ये सोन्या आणि आशुतोष गोवारीकर काम करणार होते , काही कारणामुळे ते दोघं चित्रपट करू शकत नव्हते. 

 सोन्याच्या रोलसाठी मला विचारलं आणि आशुतोष गोवारीकर चा रोलसाठी अंकुश चौधरीला विचारल, तेव्हा मी सुनील ला फोन केला होता, की असा एक चित्रपट माझ्याकडे आला आहे, ज्या मध्ये आधी तू काम करणार होतास, काय करू, मी करू का हा चित्रपट?सुनील म्हणाला अगदी नक्की कर , माझ्या तारखा जुळत नाही म्हणून मी तो करू शकत नाही. पण तू नक्की कर...... आम्ही मात्र " आई "चित्रपटानंतर कधी ही परत एकत्र काम केलं नाही.

विचार केला तर असं वाटत राहतं , कि आम्ही परत एकत्र काम केलं असतं तर किती मजा आली, म्हणून सारखं वाटत राहतं की सिनेमा क्षेत्र हा सगळा योगायोगाचा खेळ आहे. वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला तर एक Golden Jubilee सिनेमा एकत्र केला, छान आठवणी इतकी वर्ष जोपासल्या, आता अचानक भेट झाली की घट्ट मिठी मारतो ,मनसोक्त हसतो ,आयुष्यातल्या सुख-दुःखाच्या गप्पा मारतो, हे छानच आहे की, एवढं तरी कुठे बाकीच्या कलाकारांच्या नशिबी येतं.
एकत्र काम करत नसलो तरी, काम करत आहोत हेच खूप आहे. सुन्या तुला मनापासुन खुप खुप शुभेच्छा.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive