बॉलिवूडची रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर ही आपल्या बेधडक व्यक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. अलिकडेच रंगीला सिनेमाविषयी व आपल्या बॉलिवूड कारकिर्दिविषयी भाष्य केल्यानंतर उर्मिला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते तिच्या एका अफाट उत्तरामुळे. उर्मिलाने 2016 मध्ये मोहसीन अख्तर या काश्मिरी बिझनेसमनसोबत लग्नगाठ बांधली. अलिकडेच अनेक कलाकारांनी गुड न्यूज दिल्या आहेत, त्यामुळे उर्मिलालासुध्दा एका मुलाखतीत तु आई केव्हा होणार असा प्रश्न विचारण्यात आला होता.
या मुलाखतीत उर्मिलाने आपल्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी सांगितल्या. आई होण्याचा विचार करतेय का? की एखादं बाळ दत्तक घेणार आहेस? यावर उर्मिलानं मी यागोष्टींचा फार कधी विचार केला नाही, असं म्हटलं.जेव्हा व्हायचं तेव्हा ती गोष्ट होईल. प्रत्येक स्त्रीने आई व्हायलाच पाहिजे असं काही नाही. आईपण यायचं तेव्हा येईल. मलाही लहान मुलं आवडतात. पण जगातही अनेक अनाथ मुलं आहेत, ज्यांना आई-वडील नाहीत. त्यांनासुध्दा प्रेम व आपुलकी हवी आहे. मुलांना जन्म देणं माझ्या लेखी तितकसं महत्वाचं नाही.
सध्या उर्मिलाने दिलेल्या उत्तरावर बरीच चर्चा प्रसिध्दी माध्यमांमध्ये रंगली आहे.