भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. करोनाची लागण झाल्याने लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात ८ जानेवारीपासून उपचार सुरु होते. या बातमीने अवघा देश शोकसागरात बुडाला आहे.त्यांच्यात करोनाची सौम्य लक्षणं आढळून आल्याने व निमोनिया झाल्यामुळे आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. अवघा देश दीदींच्या जाण्याने शोकसागरात बुडाला आहे.
भारताची गानकोकिळा म्हणून दीदी प्रसिध्द आहेतो वडिल पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून त्यांनी गायनाचे धडे गिरवले. लतादीदी या उषा, आशा, मीना, हदयनाथ या सर्व भावंडात मोठ्या आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी आपल्या भावंडांची काळजीसंगीतात लता पर्व सुरु झाल्यानंतर कुणाचीतरी दृष्ट लागली. वर्ष होतं 1963…. याच वर्षी लतादीदींवर विषप्रयोग झाला. याबद्दल बोलताना लतादिदी म्हणतात, ‘ही खूप जुनी गोष्ट आहे. आम्ही मंगेशकर कुटुंबीय त्याबद्दल फारसं बोलत नाही. पण त्यावेळी मला विषबाधा झाली होती. घेण्यापासून त्यांच्यावर गायनाचे संस्कार केले. त्यांनी असंख्य गाणी आजपर्यंत गायली आहेत. तसंच विविध प्रादेशिक भाषांमध्येसुध्दा त्यांनी आपल्या सूरांची जादू दाखवली. त्यांच्या आयुष्यातील हा एक अत्यंत कटू अनुभव आहे.
1963 साली लतादीदींवर विषप्रयोग झाला. याबद्दल बोलताना लतादिदी म्हणतात, ‘ही खूप जुनी गोष्ट आहे. आम्ही मंगेशकर कुटुंबीय त्याबद्दल फारसं बोलत नाही. पण त्यावेळी मला विषबाधा झाली होती.“विषप्रयोगादिवशी मी झोपून होते. त्यावेळी मला भयंकर अशक्तपणा होता. मी इतकी घाबरली होती की मला उठून चालताही येत नव्हती. चालेल की नाही, याची शाश्वतीही नव्हती. लता मंगेशकर यांची तब्येत खालावली होती. काही दिवस गाणं बंद होतं. मग हलक्या आवाजात चर्चा सुरु झाली आता त्या कधीच गाणार नाहीत. पण शेवटी दीदीच त्या… त्या पुन्हा उठून उभा राहिल्या..!आणि पुन्हा श्रोत्यांना त्यांनी आपल्या सुरेल स्वरांनी मोहिनी घातली.