‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून प्राजक्ता गायकवाड महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहचली. राणी येसूबाईंच्या भूमिकेतून आपला करारी बाणा दाखवत प्राजक्ताने रसिकांची मनं जिकली. प्राजक्ता सोशल मिडीयावर बरीच सक्रीय असते. विविध फोटोशूट आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. पण नुकतंच प्राजक्ताने साश्रू नयनांनी एक पोस्ट शेयर केली आहे. नुकतंच तिच्या लाडक्या आजोबांचं निधन झालं आहे. त्यांच्या आठवणीत ती बरीच भावूक झालीय आणि त्यांच्यासाठी तिने पोस्ट शेयर कलेीय.
प्राजक्ता लिहते, आजोबा..... आता कोण बैलगाडी जुंपणार ? आता कोण माझे लाड करणार ? आता कोण माझ्यासोबत हरिपाठ घेणार ? अभंग म्हणणार ?
शिस्तप्रिय पण मनमिळावू स्वभाव... सगळ्या गावात रुबाब आणि धाक असायचा, येणाऱ्या प्रत्येकाची चेष्टा मस्करी करून बोलणं....तुकारामाची नात म्हणजे आपली येसूबाईंची भूमिका करणारी म्हणून पूर्ण गावात, तालुक्यात चर्चा....माझी नात म्हणून अभिमान बाळगणारे... शेवटपर्यंत स्वाभिमानानं , ताठ मानेनं जगलात...सगळं आयुष्य कष्टानं जगलात.
वारकरी संप्रदायात रमणारे, प्रत्येक सप्ताहात वीणा धरणारे, मला लहानपणापासून हरिपाठ , ज्ञानेश्वरी,गाथा आणि संपूर्ण भागवत संप्रदाय शिकवणारे लाडके आजोबा......️️️
कितीही प्रयत्न केला तरी डोळ्यातील अश्रू काही थांबत नाहीत, पण हे नातं खूप अतूट होतं आणि कायम राहील.....
देवाच्या मनात काय आहे याचा कधीच कोणी अंदाज लावू शकत नाही, रात्री serial बघून एकत्र जेवण करून सकाळी आपण morning walk ला जाऊ असं म्हणून सोडून गेलात आजोबा.....
मन अगदी सुन्न झालंय......परत या आजोबा....