दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या द कश्मिर फाईल्स या सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. अनेक कारणांनी हा सिनेमा चर्चेता आणि वादाचा मुद्दा ठरतोय. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. बॉक्स ऑफीसवरही हा सिनेमा धुमाकूळ घालतोय. अनेक सेलिब्रिटी, राजकारणी आणि समाजातील विविध मान्यवर व्यक्ती या सिनेमावर व्यक्त होत आहेत. अभिनेता रितेश देशमुखनेही या बहुचर्चित द काश्मिर फाईल्स सिनेमावर आपलं मत मांडलं आहे.
रितेश देशमुख ट्विट करत म्हणतो, “अनेक विक्रम मोडत असलेल्या चित्रपटाचे कौतुक करण्याची हीच ती वेळ आहे. एक छोटा असा चित्रपट जो आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपटांपैकी एक बनण्याच्या मार्गावर आहे. अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन! तुमच्या टीमसाठी प्रचंड प्रेम आणि त्यांचे फार कौतुकही.” अलिकडेच रितेशने हा सिनेमा पाहिला व त्याबद्दल त्याने आपलं मत ट्विटरवरुन मांडलं. सध्या रितेशच्या या ट्विटची चर्चा माध्यमांमध्ये आहे.
It’s time to applaud a film that continues to break records. A small film that is on its way to becoming one of the biggest films of all time. Congratulations @AnupamPKher @vivekagnihotri and the entire team of #TheKashmirFiles - on the tremendous love and appreciation.
— Riteish Deshmukh (@Riteishd) March 15, 2022
‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारख्या प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.