मुलगी झाली हो ही मालिकानेक कारणांनी चर्चे अत असते. मध्यंतरी या मालिकेतील किरण माने यांच्या भूमिकेचा वाद बराच गाजला. ही मालिका टीआरपीच्या रेसमध्येसुध्दा नेहमीच बाजी मारते. पण आता ही मालिका वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहे. मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणारे अजय पूरकर यांनी ह्या मालिकेला रामराम ठोकला आहे. सोशल मिडीयावरुन खुद्द त्यांनीच ह्याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे.
अजय पूरकर यांनी त्यांच्या फेसबूकवर ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत “नमस्कार, ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून मी तुमच्या सगळ्यांचा निरोप घेत आहे. खूप मजा आली काम करताना. अनेक अनुभव आले नव्यानी. सचिन देव सर, उत्तम दिग्दर्शक आणि टीम सांभाळून काम करणारे. सुशांत पोळ, असोसिएट डायरेक्टर उत्तम असलाच पाहिजे हे तू सिद्ध केलंस. विक्रम, सत्या, विनोद, जीतू, महादेव, राकेश, किती जणांची नावे घ्यायची? योगेश, पुन्हा एकदा आपण एकत्र काम केलं आणि खूप धम्माल पण. तसच प्रज्ञा ….एक छान सहकलाकार आणि उत्तम व्यक्ती. रश्मी…. खूप प्रेम…छान कर काम…विशेष आभार लता श्रीधर … शादाब शेख ….संजय कोलवणकर….सर्व कॅमेरा टीम…. नेपाळ गँग…पॅनोरमा प्रॉडक्शन्स खूप खूप धन्यवाद.. रोहिणी निनावे ….खूप खूप धन्यवाद, कायम सगळे लक्षात रहाणार…पुन्हा लवकरच भेटू …नवीन प्रोजेक्ट घेऊन….” असे म्हटले आहे.