सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळंच वळण आलं आहे. विविध नाट्यमय घडामोडी घडताना दिसतायत. मागच्या काही दिवसांपासून मराठी कलाकार महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य करताना दिसत आहेत. ज्यात आता नाटक आणि सिनेमा गाजवणारा प्रसिध्द अभिनेता संदीप पाठक याचीही भर पडली आहे. संदीप पाठकनं महाराष्ट्रातील राजकारण आणि राजकीय नेते यांच्याबाबत केलेलं ट्वीट सध्या चर्चेत आहे.
संदीप पाठकनं त्याच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून नुकतंच एक ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, ‘सर्व राजकीय नेते आपआपसात भांडत आहेत. परंतु एकही पक्ष किंवा एकही नेता सामान्य जनतेच्या समस्येबद्दल एक चकार शब्द बोलत नाही. महागाई, वीजटंचाई, पाणी समस्या…’ संदीप पाठकचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर बरंच व्हायरल झालेलं पाहायला मिळत आहे.
सर्व राजकीय नेते आपआपसात भांडत आहेत. परंतु एकही पक्ष किंवा एकही नेता सामान्य जनतेच्या समस्येबद्दल एक चकार शब्द बोलत नाही.महागाई, वीजटंचाई, पाणी समस्या………..
— Sandeep Pathak / संदीप पाठक (@mesandeeppathak) April 15, 2022