कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर फुलणारी राणादा आणि पाठकबाईंची हटके लव्ह स्टोरी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावून गेली. तुझ्यात जीव रंगला ही छोट्या पडद्यावरची तुफान लोकप्रिय मालिका. अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर या जोडीने राणादा व पाठकबाई साकारुन रसिकांच्या मनात घर केलं. महाराष्ट्राची ही लाडकी जोडी आता ख-या आयुष्यातही एकमेकांसोबतच रहाणार आहे. हार्दिक व अक्षयाचा आज अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर साखरपुडा संपन्न झाला आहे. या बातमीने चाहत्यांमध्ये आनंदाला उधाण आलं आहे.
सोशल मिडीयावर अक्षयाने आपल्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट करताच सेलिब्रिटींसह चाहत्यांनी या जोडीवर अभिनंदनाचा वर्षाव सुरु केला आहे.