By  
on  

'सही रे सही नाटक जेव्हा थांबेल त्याला कारणीभूत भरत जाधव असेल' ; केदार शिंदेंची पोस्ट चर्चेत

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी मराठी मनोरंजन सृष्टीला अनेक लोकप्रिय आणि यशस्वी कलाकृती दिल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सही रे सही नाटक. याच नाटकाच्या निमित्ताने केदार शिंदे यांनाही सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेयर केली आहे. या नाटकाला २० वर्षे पूर्ण  झाल्याच्या निमित्ताने त्यांनी खास पोस्ट शेयर करत एक आठवण सांगितली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kedar Shinde (@kedaarshinde)

 

केदार शिंदेंनी या पोस्ट मध्ये म्हटलंय की, "पुन्हा सही रे सही.... २० वर्ष आज पुर्ण होतायत. १५.०८.२००२ रोजी हा “सही” रथ ज्या भरधावाने निघाला तो अजूनही त्याच वेगात आहे. मला अजूनही आठवतो तो दिवस. माझ्या टाटा इंडिका गाडीतून मी आणि भरत, शिवाजी मंदिरच्या दिशेने निघालो... तेव्हा एकच गोष्ट मी भरतला वारंवार सांगत होतो. “भरत आज दिवस तुझा आहे. जे जे आजपर्यंत करावसं वाटत होतं, ते साकार करण्याचा आजचा दिवस आहे. मी पडदा उघडल्यावर पडद्यामागे असणार. रंगमंच तुझा असणार आहे. त्यामुळे बागड त्या रंगमंचावर! आपल्या आण्णांनीच तो रंगमंच बांधलाय असं समज!” आणि.... भरत जाधव याने परत परत परत परत तेच केलं. तब्बल २० वर्ष."

पुढे त्यांनी असं म्हटलंय की, "या संपुर्ण प्रवासात त्याच्या सोबत त्याच तडफेने काम करणारे कलाकार आणि पडद्यामागचे तंत्रज्ञ... त्यांचं प्रेम अजूनही या जादूई नाटकावर तेवढच आहे आणि तेवढच राहील.मी मुलीच्या बापाच्या भुमिकेत होतो आणि राहीन! आपण लाडाने प्रेमाने मुलीला वाढवायचं आणि योग्य वेळी तीचं लग्न लावल्यावर तीचा सुखाचा संसार पाहायचा! या दरम्यान मुलीला काही अडचण, त्रास झाला तर वेळोवेळी तत्परतेने पाठीशी उभंही राहायचं. माझ्या या मुलीचं लग्न भरत जाधव या कर्तव्यतत्पर मुलाशी लावलं. या दरम्यान “सासवा”(निर्माते) बदलल्या. मुलीला आणि भरतलाही त्याचा त्रास झाला. पण नेटाने त्याने संसार केला. आणि आता तर त्याने स्वत:चा संसार थाटलाय. (भरतच निर्माता झाला) खुप समाधान वाटतं!!!!"

पुढे ते लिहतात, "नाटक कधी बंद होऊ नये.. पण जेव्हा हे थांबेल त्याला कारणीभूत भरतच असेल. तो जोवर तडफेने काम करतोय तोवर हे नाटक सुरू राहील. त्याला कंटाळा येईल तेव्हा हे थांबेल! पण मला वाटत नाही की , अजून 20 वर्षाने ही वेळ येईल!श्री स्वामी समर्थांच्या कृपेने अशी कलाकृती माझ्या हातून घडली. पण यात माझ्या पाठीमागे असणारे स्वामी होतेच, पण त्या सोबत अजून एक व्यक्ती होती, माझा मित्र अंकुश चौधरी.. मी, भरत, अंकुश या तिघांच्या मैत्रीचं प्रतिबिंब म्हणजे... “सही”.." अशा भावनिक पोस्ट शेयर करत दिग्दर्शक केदार शिंदेंनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive