By  
on  

अरुंधती फेम मधुराणी म्हणते, " कोणी नसलं तरी चालेल तुझी तू रहा .."

आज  ८ मार्च जागतिक महिला दिन आहे. त्यानिमित्ताने सर्वच स्तरातून स्त्री शक्तीचा जागर केला जातोय. अनेक सेलिब्रिटी सोशल मिडीयावर व्यक्त होत आहेत. 

स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये अरुंधतीच्या आयुष्यात नवं वळण येणार आहे. अरुंधतीने आशुतोष सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशमुख कुटुंबातून बऱ्याच चांगल्या-वाईट प्रतिक्रिया उमटल्या. अनिरुद्ध, अभिषेक, कांचन यांनी तीव्र विरोध केला. मात्र यशआणि आप्पांच्या पाठिंब्यामुळे अरुंधतीच्या आयुष्यात सुखाचं चांदणं येऊ पहातंय. अरुंधतीला मुलीच्या मायेने जपणाऱ्या आप्पांनी अरुंधतीची पाठवणी देशमुखांच्या घरातूनच होणार असं ठामपणे सांगितलं. त्यामुळेच अरुंधतीची हळद, मेहंदी आणि विवाह देशमुखांच्या घरातच होणार आहे. म्हणूनच आज जागतिक महिलादिनी अरुंधती फेम मधुराणीने खास मेसेज सोशल मिडीयावरुन दिला आहे.

आज महिला दिनानिमित्त मधुराणीनं अशीच एक कविता सादर केली आहे. तिनं यासोबत पोस्ट लिहित म्हटलं आहे की, माझ्या सर्व मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!संजीवनी बोकील ह्यांची माझी अतिशय लाडकी कविता खास तुमच्यासाठी. कुणी नसलं तरी चालेल..तुझी तू रहा...

मधुराणीच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी देखील महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एकानं म्हटलं आहे की,वाह वाह! शब्द नाहीत माझ्या कडे तारीफ करायला.. तर दुसऱ्याने म्हटलं आहे की,ता आहे ही️️ आणि ते ही तुमच्या आवाजात ऐकली तर अजूनच जास्त छान वाटते ️ तुम्हाला ही महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा️ आणि आमच्या लाडक्या अरुंधती ताई ला पण महिला दिनाच्या खूप खूप सदिच्छा️..अशा अनेक कमेंट मधुराणीच्या या व्हिडिओवर आल्या आहेत.

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive