By  
on  

अनिरुद्ध-अरुंधतीच्या संवादाची मिलिंद गवळींनी केली पाकिस्तान-काश्मीरच्या मुद्द्याशी तुलना

स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये अरुंधतीच्या आयुष्यात नवं वळण येणार आहे. अरुंधतीने आशुतोष सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशमुख कुटुंबातून बऱ्याच चांगल्या-वाईट प्रतिक्रिया उमटल्या. अनिरुद्ध, अभिषेक, कांचन यांनी तीव्र विरोध केला. मात्र यशआणि आप्पांच्या पाठिंब्यामुळे अरुंधतीच्या आयुष्यात सुखाचं चांदणं येऊ पहातंय. अरुंधतीला मुलीच्या मायेने जपणाऱ्या आप्पांनी अरुंधतीची पाठवणी देशमुखांच्या घरातूनच होणार असं ठामपणे सांगितलं. त्यामुळेच अरुंधतीची हळद, मेहंदी आणि विवाह देशमुखांच्या घरातच होत आहे. इथूनच तिची पाठवणी केली गेली. 

आशुतोषसोबत अरुंधतीचे लग्न ठरण्याच्या आधीपासून अनिरुद्ध त्यांच्या नात्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करतोय. त्यांचे लग्न रोखण्याचे अनिरुद्धचे सारे प्रयत्न करून झाले, आताही त्याने अरुंधतीचा अपमान करण्याची संधी सोडत नाहीय. 

मिलिंद गवळी यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ आधी ते अरुंधती बडबडताना दिसत आहे. त्यानंतर अरुंधतीही त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसत आहे. मालिकेच्या काही भागांमधील हा व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला आहे.

मिलिंद गवळींची पोस्ट

“काय चाललंय अनिरुद्ध ?
अरे आता तरी सोड अरुंधतीला , लग्न झालंय तिचं.

आता अनिरुद्ध अरुंधतीशी ज्यावेळेला बोलायला जातो आणि त्याचे मुद्दे मांडतो त्यावेळेला मला हा पाकिस्तानचा पंतप्रधान कश्मीर विषयी बोलतोय असं वाटायला लागतं.

divorce
बातमी वाचली तर मला हाच सीन डोळ्यासमोर आला
“पाकिस्तान हर जगह कश्मीर राग अलापता रहता है और हर बार मुंह की खाता है। भारत जानता है कि आतंक को पालने वाला पाकिस्तान किस तरह के नापाक मंसूबे रखता है। भारत ने मुंहतोड़ जवाब देते हुए कहा है कि वह कश्मीर मुद्दे के बजाय पाकिस्तान में मौजूद आतंकियों से मुकाबला करने पर ध्यान दें, जो लंबे वक्त से भारत के जम्मू कश्मीर को निशाना बनाते रहे हैं।”

याच पद्धतीने अरुंधती अनिरुद्ध ला सडेतोड उत्तर देते त्याचे सगळे मुद्दे खोडून काढते,
अनिरुद्ध ला सल्ला देते की लवकर बरे व्हा, स्वतःची काय अवस्था करून घेतली आहे ती बघा, अजून खालच्या पातळीवर जाऊ नका,
पण अनिरुद्ध काय सुधारायचं नाव घेत,
जी गोष्ट आपल्या हातून निष्डून गेली आहे त्या गोष्टीच्या मागे पडण्यात काहीच अर्थ नाही हे त्याला कळत नाही,
खूपशा माणसांचं असंच होतं, ते मागचं सोडून द्यायला तयार नसतात, त्यांचा अहंकार त्यांना तसं करू देत नाही, मागचं सगळं पुसून नव्याने सुरुवात करायची हिम्मत नसते त्यांच्यात,
आणि मग सतत अपमानित होत असतात,
अनिरुद्ध जितका अपमानित झाला आहे तितका क्वचितच कोणी होत असेल, त्याचा अहंकार ठेचायला सगळ्यांनाच आवडतं, परवाच्या एपिसोडमध्ये अनघा म्हणाली बाबा तुम्ही विकृत आहात, इशा म्हणाली मला तुम्हाला बाबा म्हणायची लाज वाटते,
सुलेखाताई म्हणाल्या तुम्हाला सम उपदेशनाची गरज आहे.
पण तुम्ही कितीही काहीही त्याला म्हणा तो काय सुधारायचं नाव घेत”, असे मिलिंद गवळींनी म्हटले आहे.

 

अनेकांनी या पोस्टवर प्रतिक्रीया दिल्या आहेत. अनिरुध्द देशमुख शिवाय ही मालिका अपूर्ण आहे, तुम्ही अप्रतिम अभिनेते आहात मिलींद सर, मिलींद सर तुमच्यामुळेच ही मालिका यशोशिखरावर आहे..अशा प्रकारच्या प्रतिक्रीया या पोस्टवर मिलींद गवळींना येत आहेत.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive