By  
on  

'अग्निहोत्र 2'ला अल्प प्रतिसाद, लवकरच गुंडाळणार गाशा?

मोठा गाजावाजा करत 'अग्निहोत्र 2'ही मालिका तब्बल 10 वर्षानंतर नव्या रुपात आणि नव्या रहस्यांसह रसिकांच्या भेटीला आली खरी, पण आता प्रेक्षकांच्या मनात व टीआरपीच्या स्पर्धेत ती  तग धरु शकत नाहीय, अशी चर्चा आहे. 'अग्निहोत्र'च्या पहिल्या पर्वावर रसिकांनी भरभरुन प्रेम केलं. आठ गणपतींचं रहस्य व अग्निहोत्री कुटुंब ह्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. पण दुसरं पर्व येणार म्हणून सारेच उत्सुक होते. पहिल्या पर्वाप्रमाणे हे पर्वसुध्दा गाजेल अशी निर्माता-दिग्दर्शकांना आशा होती. आता ती सपशेल फोल ठरतेय असंच दिसतंय, कारण टीआरपीच्या आकड्यांत ती बसत नाहीय. 

'अग्निहोत्र'च्या पहिल्या पर्वाचं दिग्दर्शन सतिश राजवाडे यांनी केलं होतं, तर दुस-या पर्वाचं दिग्दर्शन भीमराव मुडे करतायत व कथा श्रीरंग गोडबोले यांची आहे. नव्या पिढीची नवी गोष्ट आणि जुन्या नव्या कलाकारांचा मेळ, उत्तम सेट अशी तगडी टीम असूनही ही मालिका रसिकांचं मन जिंकण्यात कमी पडली व तिथूनच टीआरपीचं गणित जुळेनासं झालं, त्यामुळेच आता हे दुसरं पर्व लवकरच रसिकांचा निरोप घेणार असल्याचं बोललं जात आहे. 

प्रेक्षकांच्या अपेक्षा पहिल्या पर्वाच्या तुलनेत या दुस-या पर्वात कुठेतरी पूर्ण न झाल्याने हा निर्णय घेतला जात असेलही, पण कुठेतरी प्रेक्षकांचा हिरमोडसुध्दा होतोय. मालिका आता कुठल्या वळणावर  निरोप घेणार हे पाहणंसुध्दा औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive