रिंकु राजगुरु हे नाव आता कोणाला माहित नाही असा व्यक्ती नाही. 'सैराट' या आपल्या पहिल्याच सिनेमातून 'आर्ची'ची बिनधास्त- बेधडक भुमिका साकरुन रिंकूने समीक्षकांची पसंती मिळवत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या पहिल्याच सिनेमासाठी रिंकूला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं. आर्ची म्हणून सर्वांच्या मनावर राज्य करणा-या रिंकूच्या आज वाढदिवसानिमित्त पाहूयात साडीतल्या दिलखेचक अदा.
एका सामान्य कुटुंबातून आलेल्या रिंकूने पदार्पणातच राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घातली. ‘सैराट’नंतर मात्र तिने एका समंजस मुलीसारखं ब्रेक घेतला आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं.
तिने बारावीची परिक्षा दिली आणि परिक्षेत घवघवीत यश संपादन केलं. तिने बारावीत ८२ टक्के मार्क मिळवून यश संपादन केलं.
‘कागर’ सिनेमामधून. एका साध्या मुलीचा राजकारणी होण्यापर्यंतचा प्रवास कागरमध्ये होता. या सिनेमात रिंकूचा अभिनय अधिक प्रगल्भ झाल्यासारखा वाटला. हळवी प्रेमिका ते धुर्त राजकारणी तिने उत्तम प्रकारे उभी केली.
त्यानंतर ती ‘मेक अप’ सिनेमातून रसिकांच्या समोर आली . पण या सिनेमाला म्हणावं तितकं यश मिळू शकलं नाही.
अलिकडेच रिंकूने लारा दत्ता सोबत स्क्रीन शेअर करत १०० या वेबसिरीजमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर दमदार पदार्पण केलं. या वेबसिरीजने रसिकांची मनं जिंकली.
लवकरच रिंकू बॉलिवूड पदार्पणसुध्दा करतेय. याबाबत खुद्द तिनेच एका मुलाखतीत माहिती दिली.