.श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगवेगळे आहेत. श्रावणात सात्विकता, व्रतवैकल्य, सणवार यांचा सर्वत्र उत्साह असतो. एकूणच श्रावणाचे दिवस हे भक्तीमय आणि चैतन्यपूर्ण असतात. मात्र, यातील सर्वांत महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार. श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा, पवित्र आणि शुभ मानला जातो. श्रावणी सोमवारी व्रत करणं आणि मंदिात जाऊन शंकराची पूजा-अर्चा करुन ध्यानधारणा, जप करण्याला प्रचंड महत्त्व आहे.
तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अंजलीबाई आणि राणदाचा लाडका लाडू म्हणजेच बालकलाकार राजवीर सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असतो. खास करुन सण-उत्सावांच्या दिवशी तो चाहत्यांना खास अंदाजात शुभेच्छा देतो.
आजसुध्दा शिवरुपात बसून ध्यानधारणा करणा-या राजवीरने ॐ नमः शिवायचा जप करत श्रावणी सोमवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.