‘बाळूमामाच्या नावाने चांगभलं’ या मालिकेतील रंजकता आता अधिक वाढली आहे. सत्यव्वाच्या पोटात बाळूमामाचा अंश वाढतो आहे. सत्यव्वावर कोणतंही संकट येऊ नये यासाठी गंगूताई आणि बाळूमामा पुरेपूर काळजी घेताना दिसत आहेत.
बाळूमामांचा वंश या जगात येऊ नये यासाठी अघोरी शक्ती प्रयत्नशील आहेत. अशावेळी मामा सत्यव्वाच्या पोटातील बाळाची काळजी घेण्यासाठी आणि तिला सुरक्षित ठेवण्यासाठी बाळूमामा सत्यव्वाभोवती रिंगण आखतात. त्या रिंगणाच्या बाहेर तिने पडू नये अशी सक्त सुचना करतात. पण सत्यव्वा बाळूमामांचं न ऐकता त्या रिंगणाच्या बाहेर पडते. पण पडताच क्षणी भोवळ येऊन खाली कोसळते. आता बाळूमामाचं न ऐकणं सत्यव्वाच्या जीवावर बेतणार का? बाळूमामा यावर काय उपाय करणार हे लवकरच कळेल.