‘अग्गंबाई-सासूबाई’ ही छोट्या पडद्यावरची मालिका सध्या चर्चेत आहे, ते बबड्यामुळे. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच..ह्या म्हणीप्रमाणे काहीसं सोहम उर्फ बबड्याच्या बाबतीत झालं आहे. त्याच्या बेताल आणि उर्मट वागण्यात तसूभरही फरक पडलेला नाहीय. उलट तो दिवसेंदिवस वाढतोय. त्याची बबडेगिरी सर्रास सुरु आहे. त्याचा आणि शुभ्राच्या लग्नाच्या वाढदिवसात व त्यानंतर दस-याच्या सणाच्या दिवशीसुध्दा गोंधळ घालून बबड्या मोकळा झाला आहे.
अभिजीत राजे आणि आई आसावरीला कुठल्याही परिस्थित एकत्र येऊ द्यायचं नाही याचा चंगच त्याने बांधलायत्याला काहीही करुन अभिजीत राजेंना आईच्या आयुष्यातून घालवायचं आहे. . त्यासाठी तो वाट्टैल त्या थराला जातोय. पण नेहमीच आसावरी मुलगा म्हणून त्याच्या चुका पदरात घेते, त्याला सांभाळून घेते पण आता आसावरी एक कठोर पाऊल उचलणार आहे.
आसावरी आणि अभिजीत राजेंसमोर राजेंना घालून पाडून बोलणा-या बबड्यावर आसावरीने हात उचललाच आणि इतकच नाही, तर त्याला घराबाहेरसुध्दा काढलंय, वर तिने त्याला ताकीदही दिलीय जोपर्यंत तो सुधारत नाही तोपर्यंत त्याला घराचे दरवाजे बंद....आता पुढे मालिकेत काय घडणार, सोहम कसा वागणार हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागलीय.