By  
on  

‘जीव झाला येडापिसा’ मालिकेने गाठला 400 भागांचा पल्ला

'जीव झाला येडापिसा' ही मालिका कमी कालावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेतील शिवा आणि सिद्धीची जोडीही प्रेक्षकांना प्रचंड आवडली. सुरुवातीला द्वेष मग मैत्री आणि आता प्रेमाच्या अतुट बंधनाने ही जोडी बांधली गेलीये.

 

 

 सुरुवातीचे गैरसमज आणि वाद विसरून एकमेकांचा हात घट्ट धरून त्यांनी सुखी संसाराची वाटचाल सुरू केली आहे. मालिकेतील हीच केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली आहे.  या मालिकेतील रांगडा गडी शिवा म्हणजेच अशोक फळ देसाई, सिद्धी म्हणजेच विदुला चौगुले, आत्याबाई म्हणजेच चिन्मयी सुमित, जलवा, मंगल, सोनी, विजया, सरकार  यांच्या भूमिकांना सगळ्यांचीच पसंती मिळाली आहे.

या पसंतीमुळे मालिकेने आता 400 भागांचा टप्पा पुर्ण केला आहे. यावेळी सेटवर शिवा आणि सिद्धीने केक कापून हा आनंद साजरा केला आहे. चंद्राच्या येण्याने मालिकेत आता रंजकता वाढली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive