मालिका म्हटलं की अनेक नव नवीन ट्वीस्ट कथानकात येत असतात. ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेतही आता नव्याने रंजक ट्वीस्ट येऊ घातले आहेत. ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. शिवा-सिद्धीची केमिस्ट्री, मंगलचा तिखटपणा, बेरकी आत्याबाई आणि त्याला खतपाणी घालण्यासाठी असलेली चंद्रा यांनी मालिकेत आणखी रंगत आणली आहे.
आता या मालिकेत एक नवाच ट्वीस्ट आला आहे. रागाच्या भरात मंगलने शिवा तिचा मुलगा नसल्याचं सांगितलं आहे. तर एकीकडे चंद्राही आत्याबाईंना त्यांच्या पोटचा मुलगा रुद्रायतमध्येच असल्याचं सांगते. या दोन्ही घटनांचा परस्परसंबंध असेल का हे समजण्यासाठी मात्र मालिकाच पाहावी लागेल.