स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. शिकलेली मुलगी सून म्हणून नको या मताशी ठाम असणाऱ्या जीजी अक्कांसमोर कीर्तीच्या शिक्षणाचं सत्य उघड होतं. कीर्तीने इतकी मोठी गोष्ट सर्वांपासून लपवली या गोष्टीचा जीजी अक्कांना खूप त्रास होतो आणि त्या कीर्तीला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतात. पण पती म्हणून शुभम तिच्यापाठी खंबीरपणे उभा राहतो. तिला साथ देतो आणि जिजी आक्काच्या निर्णयाचा विरोध करतो.
जिजी अक्का आणि शुभम यांच्यात किर्तीमुळे मोठी दरी निर्माण झालीय, ती लवकरच संपणार का, किर्ती काय प्रयत्न करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पुढील भागांची रसिकांना उत्सुकता असतानाही मालिका आता 100 भागांचा यशस्वी टप्पा ओलांडतेय.