'आई माझी काळुबाई' सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. सोशल मिडियावर त्याची विशेष चर्चा सातत्यानं होताना दिसते. ‘आई काळुबाई’ हे सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातलं लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं देवस्थान आहे.
मालिकेतली गोष्ट ही आर्याच्या भक्तीची आणि काळुबाईच्या शक्तीची गोष्ट आहे. या मालिकेतल्या आर्याची काळुबाईवर असलेली भक्ती तिला सर्व संकटांतून मार्ग काढण्यासाठी मदत करते.
आर्याने विराट शक्तीला भेदून गावातलं काळुबाईचं देऊळ उघडलं पण त्यानंतर मात्र तिला पाटील कुटुंबियांच्या रोषाचा सामना करावा लागतो आहे. तिला तिचे सासरे माधवराजे याची मोठी शिक्षा देणार आहेत.
आर्याला या शिक्षेतून तिची काळूबाई कशी वाचवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.