रात्रीस खेळ चाले ह्या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. ह्या मालिकेचे दोन्ही सीझन प्रचंड गाजले. पहिल्या भागात उत्तरार्ध तर दुस-या भागात पूर्वार्ध दाखविण्यात आला. कोकणच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही भयकथा सर्वांच्याच पसंतीस उतरली.
रात्रीस खेळ चाले या मालिकेतील अण्णा नाईक, शेवंता, दत्ता, माधव, पांडू, वच्छी या व्यक्तिरेखांनाही आपला ठसा उमटवला. आता आण्णा नाईक पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल...पण हे खरं आहे. झी मराठी वाहिनीच्या सोशल मिडीया पेजवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे..आणि यात रात्रीस खेळ चाले मालिकेचं तेच भयावह पार्श्वसंगीत व अण्णा नाईक अंधारात पाहायला मिळतायत.
‘अण्णा नाईक परत येणार…!! लवकरच’ असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.