सध्या विविध विषयांवर आधारित मालिका टेलिव्हिजनवर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. काही मालिका शेवटापर्यंत जातात तर काही अर्ध्यातूनच प्रेक्षकांचा निरोप घेतात. आताही झी मराठीवरील काही मालिका निरोप घेणार आहेत. तर काही श्रीगणेशा करणार आहेत.
थ्रिलर मालिका देवमाणूस लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तिची जागा ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका घेणार असल्याचं बोललं जात आहे. शशांक केतकरची मुख्य भूमिका असलेली मालिका ‘पाहिले न मी तुला’ ही देखील 1 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. याशिवाय 8 मार्च पासून ‘घेतला वसा टाकू’ नको ही मालिकाही लवकरच भेटीला येते आहे. त्यामुळे अनेक नव्या मालिकांची मेजवानी प्राईम टाईममध्ये मिळणार यात शंका नाही.