'आई कुठे काय करते' या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळतोय. ही एक कौटुंबिक मालिका असून अनेकांना आपल्या कुटुंबाचीच ही गोष्ट वाटते. या मालिकेचा विषय आणि पात्र हे प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागले आहेत. मालिकेतील यश-गौरीची केमिस्ट्री सर्वांनाच खुप भावते. सध्या मालिकेतील देशमुख कुटुंब गावी कोकणात आल्याचं पाहायला मिळतंय. ब-याच वर्षांनी गावी आल्यामुळे सर्वचजण खुप आनंदात आणि निवांत वेळ घालवतायत. पण गौरी न आल्यामुळे यशला काही चैन पडत नाहीय. त्याला जिथे पहावं तिथे गौरीच दिसतेय.
आई-बाबा ईशा, अभिषेक आणि यश हे सर्वचजण आंबे पाडण्यासाठी आमराईत आले आहेत. सर्वचजण आंबे पाडण्याचा मनसोक्त आनंद लुटतायत, फोटो काढण्यात मश्गुल आहेत. ईशाने यशला आंबे पाडताना तिचे फोटो काढायला सांगितले काय आणि हा पठ्ठ्या गौरीच्या विचारात आकंठ बुडून गेला आणि त्याच्या डोक्यात टिक टिकच वाजू लागली.
गौरीच्या सुंदर स्वप्नात हरवलेल्या यशला हे गाणंचं आयुष्यात सुरु आहे असं वाटू लागलं, पण तितक्यात ईशा आली आणि तिने त्याला या गोड स्वप्नातून जागं केलं व बिचा-या यशचा हिरमोड झाला.