By  
on  

पाहा Video : ‘आई कुठे…’ मालिका नव्या वळणावर, अभिने केलं अंकीताशी लग्न

'आई कुठे काय करते' या छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय कौटुंबिक मालिकेत सध्या अभिषेक-अनघाच्या साखरपुड्याची धामधूम पाहायला मिळतेय. साखरपुड्यासाठी गावी आलेल्या  देशमुखांच्या या हस-या खेळत्या कुटुंबांत संजनाच्या येण्याने मीठाचा खडा पडलाय. पण सर्वचजण तिथे कानाडोळा करत अभिन-अनघाच्या साखरपुड्याची मजा घेत होते, पण इतक्यात अभि-अनघा एकमेकांना अंगठी घालणार तोच माशी शिंकल्याप्रमाणे अंकीताचा अभिला फोन येतो. फोनवर तिच्या आईकडून अंकीता आत्महत्या करतेय असं कळल्यावर अभिषेक ताबडतोब साखरपुडा सोडून तिच्या गरी जायला निघतो आणि संपूर्ण रंगाचा बेरंग होतो. 

इथे अरुंधती यासर्वांमागे संजनाचा हात असल्याचं अचूक ओळखते. शुभकार्यात विघ्न आणण्याचा संजनाचा मनसुबा आहे. संजनाच्या या कारस्थानाविषयी कळताच अरुंधतीने माझ्या संसारात ढवळाढवळ केलीस मात्र माझ्या मुलांच्या वाटेला जायचं नाही असं म्हणत संजनाच्या कानशिलात लगावली आहे. अरुंधतीचं हे रौद्ररुप संजनासाठी नक्कीच धक्कादायक आहे. पण जेव्हा जेव्हा आपल्या मुलांच्या सुखाचा प्रश्न असतो तेव्हा आईची कसोटीही लागतेच. आजवर स्वत:चं दु:ख बाजूला ठेऊन अरुंधतीने मुलांच्या सुखाचाच विचार केला आहे. म्हणूनच मुलांच्या सुखाआड येऊ पाहणाऱ्या संजनाला अरुंधतीने खणखणीत उत्तर दिलं आहे.तसंच तिला तिथून निघून जाण्यासाठीसुध्दा दरडावलंय. 

पण मालिकेच्या पुढील भागात लवकरच एक नवा ट्विस्ट येणार असल्याचं एका प्रोमोतून समोर आलं आहे. अभि मुंबईहून परत येतो, म्हणून सर्वचजण खुप खुश होतात. अनघासुध्दा आनंदून जाते. घरीच साखरपुडा करुन घ्यावा म्हणून सर्वचजण सज्ज असतात. इतक्यात  अभिषेक दारात येऊन ठेपतो. अरुंधती त्याचं औक्षण करण्यासाठी पुढे जाते तोच अंकिताला पाहून सर्वांनाच धक्का बसतो. ती म्हणते, मी आणि अभिने लग्न केलंय.हे ऐकून अरुंधतीच्या पायाखालची जमिनच सरकते. 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

अंकीताचं अभिसोबत झालेल्या लग्नानंतर आता देशमुख कुटुंबावर आणखी काय संकट येणार, अनघाचं काय होणार, अभिला हे लग्न मान्य असेल का, संजना आता कुठली नवी खेळी खेळणार या सर्व प्रश्नांची उत्तरं आई कुठे काय करते मालिकेच्या आगामी भागांमध्ये मिळतील. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive