देशमुखांच्या घरात आधीच संजना कमी होती की काय, तर आता आणखी शिरजोरी करायला अंकिता येऊन ठेपलीय. अभिने अनघाला डावलून अपघाताने का होईना पण अंकिताशी केलेलं लग्न कोणालाच मान्य नाहीय. त्यातून अंकिताचं घरातलं फटकून वागणं ,तावातावाने बोलणं आणि मुख्य म्हणजे संजनासोबत तिच्या गुजगोष्टी चालणं हे अजिबातच कुणाला पटत नाहीय. देशमुखांच्या सर्वात जवळचं कोण यासाठी संजना आणि अंकितामध्ये एक प्रकारची जणू स्पर्धाच लागल्याचं पाहायला मिळतंय.
अशातच आता उशिरापर्यंत अंकिताला झोपून राहिलेलं पाहून संजनाला चांगलाच चान्स मिळतो. ती तडक तिला सुनवायला घेते, घरातली नवीन सून असून असं उशिरापर्यंत झोपणं तुला शोभतं का असं सुनावते, यावर अंकितासुध्दा काहीही सहन करत..तु मला सांगणारी कोण असा जाब तिला विचारते आणि दोघींमध्ये चांगलीच जुंपते. इतक्यात अरुंधती तिथे येते आणि कडक शब्दांत ताकिद देते , मी ठरवलं तर तुम्हा दोघींनाही या घराबाहेर काढू शकतेय
यामुळे आता आई कुठे काय करते मालिकेत उत्कंठावर्धक वळण पाहायला मिळणार हे नक्की.