By  
on  

‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेच्या 200 एपिसोड्सनिमित्त समिधा गुरुने केली ही खास गोष्ट

लॉकडाऊनमधलं लग्न हा हटके विषय घेऊन भेटीला आलेली मालिका म्हणजे  ‘शुभमंगल ऑनलाईन’. या मालिकेत शंतनू आणि शर्वरीचे व्हिडिओ कॉलवर भेटीगाठी, बोलण सुरू झालं आणि या दोघांचे हे गोड नातं ऑनलाईनच हळूहळू फुलू लागलं. यानंतर रंगलेला लॉकडाउन दरम्यानचा ऑनलाईन लग्नसोहळा आणि ऑनलाईन लग्नाची तारेवरची कसरत सर्वांना अनुभवता आली.

 

 

कान्हाज मॅजिक संस्थेची निर्मिती असलेल्या  या मालिकेने आता 200 भागांचा टप्पा पार केला आहे. या मालिकेत ऐश्वर्याही नकारात्मक भूमिका साकारणारी समिधा गुरु हिने खास कविता लिहून भावना शेअर केल्या आहेत. या कवितेत तिने टीम मेंबर्ससोबत असलेल्या बाँडिंगबाबत लिहिलं आहे. या मालिकेत सध्या रंजक वळण आलं आहे. माधुरी शर्वरीला शंतनूपासून लांब तिच्या घरी घेऊन आली आहे. पण शंतनूने मात्र शर्वरीची साथ न सोडण्याचा वसा घेतला आहे. आता शर्वरी शंतनूच्या प्रेम कहानीला कोणत्या परिक्षेतून जावं लागेल हे लवकरच कळेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive