‘आई कुठे काय करते’ या मालिकेत एकावर एक घडामोडी दिसत आहेत. अभिने अनघाला डावलून अपघाताने का होईना पण अंकिताशी केलेलं लग्न कोणालाच मान्य नाहीय. त्यामुळे घरात अस्थिर वातावरण आहे. त्यातच घरात स्वंयपाक अंकिता आणि संजना करतील असं ठरतं. पण सगळेजण जेवायला बसतात त्यावेळी आजीच्या लक्षात येतं की, सगळा स्वयंपाक अरुंधतीने केला आहे.
यावरुन त्या अरुंधतीवर चिडतात. तू कशाला यांना पाठीशी घालतेस? यांना कधी स्वयंपाक जमणार ? हे प्रश्न त्या अरुंधतीला विचारतात. याशिवाय घरात स्वयंपाक करता येणं हे जास्त महत्त्वाचं आहे हे देखील आवर्जुन सांगतात. आता यावर संजना आणि अंकिता काय प्रतिक्रिया देतात हे पुढील भागात कळेलच.