‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेत समिधा गुरुने खलनायिका साकारली आहे. समिधाने साकारलेली ऐश्वर्या मालिकेत भाव खाऊन गेली. शंतनू आणि शर्वरीमध्ये फुट टाकणारी, उतावळी, रागीट ऐश्वर्या तिने उत्तम साकारली.
आता ऐश्वर्याची लवकरच या मालिकेतून एक्झिट होणार असल्याचे संकेत समिधाने दिले आहे.
समिधाने एक खास पोस्ट शेअर केली आहे. यात ती म्हणते, ‘bye aishwarya….. नवीन प्रवास सुरु होण्यापूर्वी आधीचा प्रवास संपवून मग पुढे जाव लागतं ,पण अभिनेत्री म्हणून केलेले काही प्रवास असे असतात की ते संपत नाहीत, त्याच्या पाऊलखुणा सोबत असतात,शुभमंगल ऑनलाइन हा असाच एक कायम स्मरणात राहणार प्रवास.मनीष दळवीचा फोन आला एक कॅमिओ आहे,खलनायिका.. करायला अवडेल का ?? मुळात वैभव आणि मनीष उत्तम काहीतरी असल्याशिवाय विचारणार नाही ह्याची खात्री त्यामुळे लागेच हो म्हणले.सगळ्यांची भट्टी जमली होती, ह्यात आपण चपखल बसू का अशी भीती असताना प्रत्येक कालाकाराने हाताला धरून माझा हा प्रवास सुखद केला , एक एक दिवस जात होता तस इथेही एक एक नातं घट्ट होतं गेलं..ऐश्वर्या सगळ्यांना आवडायला लागली आणि हा फक्त15 दिवसांचा प्रवास मी तब्बल 7 महिने केला ..मंजिरी , सुबोध हा जो आयुष्यभराचा ठेवा दिलात त्यासाठी कायम ऋणी असेन .मनीष , वैभव , निशांत, मिलिंद, जीतूभाई , जित,मुग्धा , चेतन तुमच्यामुळे ऐश्वर्या उभी राहिली.आणि माझ्या सदावर्ते, गावस्कर कुटुंबाने ती तितक्याच प्रेमाने पुढे नेली .मंजिरी तू सिरीयल नाही तर खरच एक कुटुंब उभ केलस .अगदी मेक उप रूम सजवण्यापासून , एकत्र जेवण, गप्पा , गाणी आणि तेवढ्याच ताकदीने एकमेकांसमोर सिन करताना उभं राहणार माझं हे कुटुंब , मी हे सगळं जपून ठेवणार आहे ..सेटवर माझी काळजी घेण्यापासून तर मी एक महिना आजारी असताना सुद्धा मला सांभाळून घेतलं आणि पुन्हा आल्यावर प्रत्येकानं काम करण्याची ताकद , उमेद दिली..प्रत्येकविषयी लिहिणं म्हणजे रोजचा एक लेख लिहू शकेन मी .एवढंच सांगेन हा सगळा खजिना मी आयुष्यभर संभाळेन, आणि माझ्या पुढच्या प्रवासात ह्या आठवणी, तुमचं प्रेम सोबत असेलच ..पुन्हा भेटूया ..’