प्रत्येक निर्णयात प्रत्येक संकटात गौरीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असलेला जयदीपचं सर्वानांचं कौतुक वाटत होतं. गौरीसुध्दा आपलं हक्काचं माणूस सोबत आहे म्हणून प्रचंड खुश होती. त्यांच्यात हळूहळू प्रेम फुलतंय असं वाटत असतानाच अचानक या कहाणीला वेगळं वळण मिळतंय. बालपणापासूनचे घनिष्ट मित्र असलेले गौरी-जयदीपचं नातं ता वेगळ्या वाटेवर आहे.
अनेक वर्षांपासून गौरीने जयदीपबद्दलच्या प्रेमाच्या भावना मनात दाबून ठेवल्या होत्या. अपघाताने का होईना पण त्याचं लग्न झालं आणि गौरीच्या पदरात सुख पडलं. म्हणूनच गौरीने आपल्या जयदीपबद्दलच्या प्रेमभावना त्याच्याजवळ व्यक्त केल्या पण त्याची प्रतिक्रीया पाहून तिचा हिरमोडच झाला नाही तर ती पार कोलमडून गेली.
गौरीची माफी मागायला आलेल्या जयदीपला मनातून खचलेल्या गौरीने त्याला आता आपल्यात फक्त मालक आणि नोकराचं नातं आहे, हे स्पष्ट सांगितलं.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’,च्या पुढील भागात आता नेमकं काय घडणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.