By  
on  

मल्हारचं सरप्राईझ घेऊन येणार का अंतराच्या घरात नवं वादळ ?

जीव माझा गुंतला मालिकेमध्ये पत्रिका प्रकरणामुळे श्वेता कायमच थोडीशी घाबरलेली असते. मल्हारच्या पत्रिकेत असलेल्या दोषामुळे त्याचं लग्न अशाच मुलीशी होऊ शकतं जिच्या पत्रिकेमध्ये देखील सारखा दोष आहे. पण, पत्रिकेच्या करण्यात आलेल्या अदलाबदलीमुळे सगळाच घोळ होऊन बसला. मल्हारचं लग्न अंतराऐवजी श्वेताशी ठरलं. अंतरा, मल्हार आणि मल्हारच्या घरचे याबद्दल अनभिज्ञ आहेत.

 

 

अंतराचा वाढदिवस घरचे मिळून साजरा करणार असून, मल्हारचा आणि त्याच्या कुटुंबाला असं वाटत आहे की श्वेताचा वाढदिवस आहे आणि म्हणूनच मल्हार तिच्यासाठी सरप्राईझ प्लॅन करणार आहे. आता अंतराच्या वाढदिवशी मल्हारने श्वेतासाठी पाठवलेलं स्पेशल सरप्राईज घरच्यांना आनंद देणार की नवं वादळ आणणार? यामुळे अंतराच्या घरी नक्की काय गोंधळ होणार ? नियती मल्हार आणि अंतराला एकत्र आणू पाहते आहे. अंतराच्या पत्रिकेतील दोषामुळे मल्हार आणि अंतराचं सूत जुळणार ?

Author

Recommended

PeepingMoon Exclusive