By  
on  

अरुंधतीचा घेतलाय हा महत्त्वपूर्ण निर्णय ..?, पाहा Video

छोट्या पडद्यावरची 'आई कुठे काय करते' ही मालिका दिवसेंदिवस रंजक होतेय. या मालिकेच्या प्रत्येक भागाची रसिक प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अरुंधतीच्या शब्दाखातर अनिरुध्दने संजनाशी लग्न केलं खरं, पण यानंतर देशमुखांच्या घरातील शांतता मात्र पार हद्दपार झाली. ते हसतं-खेळतं घर पुरतं कोलमडलं. हेकेखोर संजना माप ओलांडून घरात आली खरी, पण कुटुंबाची मात्र पुरती वाताहत सुरु झाली. 

गणेशोत्सवानंतर अरुंधती आईकडे डोंबिवलीला परतली. तिची आश्रमाच्या ऑफीसातली नोकरीही सुरु झाली आहे. त्यामुळेच ती त्यात व्यस्त आहे. तर इथे संजना मात्र बेकार झाली आहे. विविध ठिकाणी नोकरीसाठी इंटरव्ह्यू देतेय. संजनाला घरकाम अजिबातच येत नाही आणि विमलशी तिचं पटत नाही यावरुन आज्जी आणि तिच्यात सतत खटके उडतायत. म्हणूनच संजनाने तिच्या आणि अनिरुध्दसाठी नवी बाई कामाला ठेवलीय. या घरकामावरुन कांचन आज्जी व संजनामध्ये सारखे वाद-विवाद सुरु आहेत. 

अरुंधती डोंबिवलीला राहतेय आणि तिच्या नोकरीचं ठिकाण आहे,बोरिवलीतील जे देशमुखांच्या समृध्दी बंगल्याजवळ. म्हणूनच अरुंधतीने एक मोठा निर्णय घेतलाय ज्यामुळे आई-आप्पा व मुलांच्या खाण्या-पिण्याची आबाळ होणार नाही. अरुंधती आता देशमुखांच्या घरासमोर गौरीकडे राहायला आली आहे. हे संजनाला समजताच तिचा मात्र पुरता तिळपापड होणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

का माझ्या घरात आणि संसारात लुडबूड करतेयस असा जाब संजना अरुंधतीला विचारते, यावर अरुंधती सडेतोड उत्तर देत म्हणते, मला इथे राहून माझ्या मुलांकडे लक्ष देणं सोप्पं आहे म्हणून मी इथे रहाणार आहे,मला कोणीही अडवायचं नाही. 

त्यामुळे आता पुढे काय होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive